breaking-newsताज्या घडामोडीराजकारण
राज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा, मनसेची मागणी
मुंबई : “संपूर्ण राज्यात सरकारी कर्फ्यू जाहीर करावा”, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमधील अत्यवाश्यक सेवा सोडून सर्व खासगी ऑफिस आणि दुकानं 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सराकरने घेतला आहे.
“महाराष्ट्राची इटली होऊ द्यायची नसेल आणि जर जनतेला केलेले ‘स्वयंशिस्ती’ चे आवाहन काम करणार नसेल, तर सरकारला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. गरज पडल्यास संपूर्ण राज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा”, अशी मागणी ट्वीट करत आमदार राजू पाटील यांनी केली आहे.