breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
राज्यातील सरकारला जनतेच्या जीवाची पर्वा नाही : चंद्रकांत पाटील
मुंबई । प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जनतेच्या जीवाची पर्वा नाही. राज्यात वाढीव वीजबिल घोटाळ्यामुळे सामान्य जनता आत्महत्या करीत आहे. पण सरकार असंवेदनशील आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
वाढीव वीजबिल विरोधात भाजपाच्या वतीने सोमवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आले. वीज बिलांची होळी करण्यात आली. त्यापार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.