breaking-newsमहाराष्ट्र
राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी २६ दिवसांवर
मुंबई : एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असताना एक चांगली बातमी हाती आली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आहे. राज्यातील रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे २६ दिवसांवर गेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.४९ टक्के एवढा आहे.
राज्यात सध्या ५३ हजार ९०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात गुरुवारी १६७२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६० हजार ८३८ झाली आहे. दरम्यान, काल कोरोनाच्या ३७५२ नवीन रुग्णांचे निदान झाले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.