राजीव गांधी फाऊंडेशनला चीनने आर्थिक सहाय्य केलं, रविशंकर प्रसाद यांचा दावा
नवी दिल्ली | राजीव गांधी फाऊंडेशनला चीनने आर्थिक सहाय्य केल्याचा दावा केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. रविशंकर यांनी सांगितलं, राजीव गांधी फाऊंडेशनला चीनने पैसे दिले आहेत. त्यामुळे चीनसोबत हे प्रेम कसं वाढलं हे कॉँग्रेसने सांगावं. काँग्रेसच्या काळातच चीनने आपल्या जागा हस्तगत केल्या. कायद्यानुसार, सरकारची परवानगी घेतल्याशिवाय विदेशातून पैसे घेणं गुन्हा आहे. त्यामुळे हे डोनेशन घेताना सरकारची त्यांनी परवानगी घेतली होती का हे काँग्रेसने स्पष्ट करावं असं रविशंकर यांनी म्हटलं आहे.
चीनच्या एम्बेसीने राजीव गांधी फाऊंडेशनला आर्थिक सहाय्य केलं होतं. 2005 च्या डोनर सूचीमध्येच असं नमूद आहे. शिवाय या लिस्टमध्ये अनेक उद्योगपती आणि पीएसयू यांचीही नावं आहेत. त्यामुळे काँग्रेसला चीनकडून सहाय्य घेण्याची वेळ का आली असा प्रश्न रविशंकर यांनी विचारला आहे. ही एक राजनितीक चाल होती, असंही रविशंकर यांनी म्हटलंय. तसंच, यामुळेच काँग्रेस सरकारच्या काळात भारत आणि चीनमधील व्यापार ३३ टक्क्यांनी वाढला. त्यामुळे चीनप्रती एवढं प्रेम का निर्माण झालं असा प्रश्न रविशंकर यांनी विचारला आहे. राजीव गांधी फाऊंडेशनला चिनी दुतावास पैसे देतात, असंही ते म्हणाले. काँग्रेसच्या काळात काँग्रेसने भारताचा अनेक भाग चीनला देऊन टाकला आहे. १० वर्ष काँग्रेसच्या लोकांनी चीनसमोर गुढघे टेकले आहेत. त्यामुळे चीनवरून केव्हावी प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते तेव्हा तत्कालीन सुरक्षामंत्री सडेतोड उत्तरं देऊ शकत नव्हते.