breaking-newsमुंबई

राजकारण करण्यापेक्षा कोरोनावर लक्ष देणं गरजेचं- जितेंद्र आव्हाड

ठाणे – भाजपमध्ये गेलेले काही आमदार राष्ट्रवादीत पुन्हा परतणार असल्याची शक्यता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली होती. त्यावर राज्याचजे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सद्या कोरोनाच्या काळात कोरोनावर लक्ष देमं गरजेचं आहे. या कठीण परिस्थितीत राजकारण योग्य नाही, असं ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांचा मुंब्रा मतदारसंघ हॉटस्पॉट म्हणून घोषित झाला होता. मात्र, ७ ऑगस्ट रोजी इथं एकही नवा कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. तसेच, ठाण्यातील रुग्णवाढीचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे या ठिकाणची रुग्णसंख्या अटोक्यात आली आहे. दरम्यान, ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट व्हावी, यासाठी मुंब्र्यातील हाच पॅटर्न सर्वांनी फॉलो करावा, असे मत जितेंद्र आव्हाडांनी यावेळी व्यक्त केले.

“काही जण राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या अफवा पसरवत आहेत. हे वृत्त निराधार आणि कपोलकल्पित आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक आहेत. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याविषयी लवकरच निर्णय घेऊन घोषणा करण्यात येईल” अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button