breaking-newsमनोरंजन

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे निधन

मुंबई : ‘प्यार तूने क्या किया’ ,रोड ,उम्मीद , लव इन नेपाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिग्दर्शकाची भूमिका बजावणारे रजत मुखर्जी यांचे निधन झाले आहे. किडनीच्या समस्येमुळे रजत यांचे निधन झाले. किडनीच्या समस्येमुळे त्यांचं निधन झाल्याचं समजतंय. शनिवारी त्यांनी जयपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला.

रजत मुखर्जी हे मुंबईत वास्तव्यास होते, परंतु लॉकडाऊनमुळे ते त्यांच्या गावी जयपूरला गेले होते. त्यांच्या मृत्यूमुळे कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. अभिनेता मनोज  वाजपेयीने सोशल मीडियाच्या  रजत मुखर्जी यांना श्रद्दांजली वाहिली आहे. ते दोघे चांगले मित्र होते. 

‘माझा चांगला मित्र आणि दिग्दर्शक रजत मुखर्जी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपसून ते आजारी असल्यामुळे जयपूरमध्ये त्यांचं निधन झालं. आता पुन्हा कधी या दोन मित्रांची भेट होणार नाही याची खंत आहे. जिथे आहेस तिथे खूश राहा’  असं ट्विट मनोज  वाजपेयीने केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button