breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
रयतच्या शेतकरी परिषदेत, मुख्यमंत्र्याकडून शेतक-यांना उसाच्या पहिल्या उचलीची होणार घोषणा
रयत शेतकरी संघटनेची कोडोलीला 24 आॅक्टोबरला शेतकरी परिषद
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मंत्री सदाभाऊंचा करावा लागेल सत्कार ?
मुंबई – यंदा ऊस उत्पादक शेतक-यांना ऊसाची पहिली उचल 3 हजार 575 रुपये दर जाहीर केल्यास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांचा स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत जाहीर सत्कार करु, असे आव्हान खासदार राजू शेट्टी यांनी केले होते. मात्र, ऊस उत्पादक शेतक-यांना ऊसाची यंदा पहिली उचल 3 हजार 575 रुपये विनाकपात मिळणार आहे, त्यांची कोडोलीतील शेतकरी परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकृत घोषणा करणार आहेत, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत शेतकरी संघटनेकडून देण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्रात उसाच्या पहिल्या उचलीवरून यंदा राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. रयत शेतकरी संघटनेने यंदा स्वत:च ऊस परिषदेचे आयोजन केले आहे. ऊस दराचे श्रेय स्वाभिमानीला मिळू नये, म्हणून सरकारने तातडीने पावले उचलत शेट्टींना कोंडीत पकडले आहे. मंत्री सदाभाऊ खोत यांनी काही दिवसापुर्वी सांगलीत एका सभेत उसाला पहिली उचल ३ हजार ५७५ रू. मिळणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार सदाभाऊ खोत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी पहिली उचल ३ हजार ५७५ रू. देण्यास मान्यता दिल्याची माहिती संघटनेने दिली. त्यामुळे वारणा-कोडोली येथील दि. २४ ऑक्टोबरच्या रयत शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत सरकारच्या वतीने याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. तसेच राज्य सरकारकडून फरकाची रक्कम थेट शेतकर्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यानी हे दर जाहीर केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मंत्री सदाभाऊ खोत यांचा सत्कार करणार का? हे पहावे लागणार आहे.