breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
यवतमाळ | यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना जिल्ह्यातील राळेगाव येथील गुजरी शिवारात घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. अरुण गोंडे यांच्यासह पाच जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
गुजरी शिवारातील अरुण गोंडे हे कांहीदिवसांपासून गायी चरण्यासाठी शेतातील शेडमध्ये मुक्कामास होते. काल (29 मार्च) संध्याकाळी राळेगाव येथे विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रात्री वीज पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका गायीचाही मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील सहाजणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. या कुटुंबाच्या एकूण 50 गायी असून एक गायचाही मृत्यू झाला आहे.