breaking-newsराष्ट्रिय
‘मोदींना भेटण्यासाठी राजस्थान सरकार निवडक लोकांना नियुक्त करणार’
जयपूर : पुढील महिन्यात होणा-या नरेंद्र मोदींच्या राजस्थान दौऱ्यामध्ये निवडक लोकांना त्यांच्या भेटीसाठी बोलावले जाईल अशी माहिती राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी दिली. यावेळी नरेंद्र मोदींशी संवाद साधण्यासाठी सरकारी योजनांचा लाभ झालेल्या लोकांनाच त्यांना भेटवण्यात येणार आहे. त्यांचा एक गट त्यांना ७ जुलैला जयपूर मध्ये भेटणार आहे.
यापूर्वी सुद्धा पंत्रप्रधानांनी विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे फायद्याच्याच लोकांशी सवांद साधला होता. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, ते लोक सरकारच्या मदतीपासून वंचित राहिले होते. जेव्हा-जेव्हा पंतप्रधानांनी राज्याचे दौरे केले तेव्हा त्यांनी राजस्थानमधील जनतेच्या हितासाठी कोणतीही घोषणा केली नाही असे आरोप पायलट यांनी लावले.