मुंबईत बिहारमधील आणखी एका बॉलिवूड कलाकाराचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
मुंबई: मुंबईमध्ये आणखी एका बिहारमधील कलाकाराचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे. या नवोदित कलाकाराचे नाव अक्षत उत्कर्ष असून तो मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होता. मिळालेल्या माहितीनुसार तो बॉलिवूडमधील नवोदित कलाकार होता. तो बिहारच्या मुजफ्फरपूरमधील सिकंदरपूरचा तो मुळ रहिवासी होता. दरम्यान अक्षतच्या कुटुंबीयांनी त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केलेला आहे. त्यांनी त्याची हत्या झाली असल्याचा आरोप केलेला आहे.
दिवंगत अभिनेत्याचे मामा रंजित यांनी अशी माहिती दिलेली आहे की, रविवारी रात्री 9 वाजता अक्षतने त्याच्या वडिलांशी बातचीत केलेली होती. त्यानंतर उशिरा रात्री त्याच्या मृत्यूची बातमी कळली आहे. त्याचप्रमाणे अक्षतच्या मामांनी मुंबई पोलीस यामध्ये सहकार्य करत नसल्याचा आरोप केलेला आहे. मुजफ्फरपूरमधील सिकंदरपूरचा रहिवासी असून विजयंत चौधरी उर्फ राजू चौधरी यांचा तो मुलगा होता. त्याचा मृतदेह मुंबईहून त्याच्या राहत्या ठिकाणी पोहोचवण्यात आलेला आहे.
मुंबई पोलिसांवर अक्षतच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केलेले आहेत. पोलिसांनी याप्रकरणात कोणतेही सहकार्य न केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे यामध्ये त्यांनी एफआयआर दाखल करून घेतली नाही, असेही त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणात अद्याप सविस्तर माहिती मिळणे बाकी आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात निर्णाण झालेला गुंता सोडवण्याचे काम देशातील महत्त्वाच्या एजन्सींकडून सुरू आहे. त्यामध्येच ही बातमी आल्याने मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा लक्ष्य केले जात आहे.