महासभेत माजी महापौरांमध्ये जोरदार खडाजंगी
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपळेगुरव येथील मदिर दुर्घटनेवर चर्चा संपल्यानंतर माजी महापौर नितीन काळजे यांनी बोलायला सुरुवात करताच माजी महापौर मंगला कदम यांनी त्यावर आक्षेप घेतला. यावरून या दोन्ही माजी महापौरांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
पिंपरी-चिंचवड महापलिकेची तहकूब महासभा आज शुक्रवारी (दि. 22) घेण्यात आली आहे. पिंपळेगुरव येथील महादेव मंदिराचे बांधकाम कोसळून तिघांचा मृत्यू झाला. तर, सात ते आठ मजुर जखमी आहेत. या दुर्घनेवर सभागृहात आज चर्चा झाली. याप्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची गटनेत्यांनी मागणी केली. त्यावर याबाबत एक बैठक घेण्यात येईल असे, महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.
या चर्चेनंतर माजी महापौर नितीन काळजे बोलण्यास उभे राहिले. त्यांनी पिंपळेगुरव येथील दुर्घनेच्या विषयावर बोलण्यास सुरवात केली. त्यावर माजी महापौर मंगला कदम यांनी आक्षेप घेऊन आम्हाला पण यावर बोलू द्यावे. गटनेते बोलल्यानंतर कोणीही बोलले नाही पाहिजे, असे संकेत आहेत. बोलल्यास गटनेत्यांचा अवमान होत असल्याचे सांगत काळजे यांना बोलण्यापासून त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला.
काळजे म्हणाले, मला रोखण्याचा तुमचा संबंध नाही. मी त्या दुर्घनेवर बोलत नाही. तुम्ही उगाच आकांडतांडव करू नका. एवढा गोंधळ घालू नका. मी बोलायचे की नाही महापौर सांगतील, तुम्ही सांगायची गरज नाही. त्याला कदम यांनी देखील आक्रमकपणे उत्तर दिले. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार खंडाजगी झाली. महापौर राहुल जाधव यांनी दुसरा विषय घेत काळजे यांना थांबविले.