महाविकासआघाडी सरकारचं आज संध्याकाळपर्यंत काय होतंय ते बघाच – चंद्रकात पाटील
मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी
आम्हाला हे सरकार पाडण्यात रस नाही. हे सरकार विसंगतावर पडणार आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यांच्यातील विसंगती दिसेल. असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटल यांनी केला. महाविकासआघाडीत आज संध्याकाळपर्यंत काय काय घडतंय ते बघा, आम्ही काहीच करायची गरज नाही. दोन पक्षाच्या दोन मंत्र्यांनी मीटिंग बोलावल्या आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महिलांवरील अत्याचार, ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांना मदत या प्रमुख मुद्यांवरून महाविकास आघाडी सरकारच्याविरोधात भाजप आंदोलन करणार आहे. हे आंदोलन 25 फेब्रुवारीला होणार आहे. तहसील कार्यालयांवर आंदोलन होणार आहे, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
हे सरकार विसंगतावर पडणार. आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला यांच्यातील विसंगती दिसेल. तिन्ही पक्षांच्या आज बैठका आहेत, तेव्हा दिसून येईल, असा दावाही चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला. यांच्यात आज संध्याकाळपर्यंत काय काय होतंय ते बघा, आम्ही काहीच करायची गरज नाही. दोन पक्षाच्या दोन मंत्र्यांनी आपापल्या मीटिंग बोलावल्या आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
हे सरकार आपोआपच पडेल, पण परत सरकार बनवण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मध्यावधी निवडणुका होतील असंच मी सातत्यानं म्हणत आलोय. चोरुन सत्ता घेणाऱ्यांनी आम्हाला बोलू नये, असा टोला चंद्रकांत पाटलांनी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिकांना लगावला.