breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरुन लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ

नवी दिल्ली | राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर लोकसभेत मोठा गोंधळ झाला आहे. वेलमध्ये येत खासदारांना घोषणाबाजी सुरु केली. बॅनर आणि पोस्टर दाखवत ही घोषणाबाजी सुरु होती. लोकसभा अध्यक्षांनी शांती ठेवण्याचं आवाहन केलं. पण खासदार शांत होत नसल्याने अखेर अध्यक्षांनी या खासदारांना बाहेर काढण्याचे आदेश दिले. लोकसभेचं कामकाज अध्यक्षांनी १२ वाजेपर्यंत तहकूब केलं आहे.

राज्यसभेतही अशाच गोंधळ पाहायला मिळाला. त्यानंतर राज्यसभेचे सभापती वेंकैया नायडू यांनी राज्यसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब केलं आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी, ‘आज संसदेसाठी काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे. संसदेच्या सदस्यांनी मार्शलसोबत हाणामारी नाही केली.’संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. सोमवारी काँग्रेसने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button