महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याचा सरकारचा निर्णय – राजेश टोपे
मुंबई | देशभरात कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग होत आहे. राज्यातही कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 39 वर पोहोचली आहे. यातच आता खबरदारी म्हणून सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तेसेच, याबाबत निवडणूक आयोगाकडे शिफारसदेखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना व्हायरसबद्दल आढावा बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, आपल्याकडे कोरोना व्हायरसची पातळी ही दुसऱ्या स्तरावर पोहोचली आहे. राज्यात अजून कोरोनामुळे तिसऱ्या स्तरावरची परिस्थिती पोहोचली नाही.
राज्यातील कोरोनाचा कहर पाहता राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करुन सर्व विद्यापीठ परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे. उद्यापासून राज्यातील सर्व विद्यापीठ महाविद्यालय, इंजिनिअर यासह वेगवेगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे. ज्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे त्या एप्रिल महिन्यात घेण्यात येतील.
राज्यात काही दिवसात महापालिका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. अनेकांनी कोरोनाची गंभीरता पाहता, निवडणूका पुढ ढकलण्याची मागणी केली होती. याबाबत बोलताना टोपे म्हणाले की, कोरोना व्हायरसची परिस्थितीत पाहत निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्यात यावा असा निर्णय राज्य सरकारचा झाला आहे. याबाबत निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली आहे. निवडणूक आयोग यावर आपला निर्णय लवकर घेतली.