breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मराठा आरक्षण 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करायला हवं; सिब्बल यांचा युक्तिवाद

नवी दिल्ली | मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी आता शुक्रवारी म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. मराठा आरक्षण प्रकरण 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करायला हवं, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केला. तर इंद्रा सहानी प्रकरणाचा दाखला देत मराठा आरक्षण प्रकरणावर चर्चा करण्यासाठी मोठं खंडपीठ हवं, असं मुकुल रोहतगी यांनी म्हटलं आहे.

पहिल्यांदा युक्तिवाद कोणी करावा यावरुन मुकुल रोहतही आणि कपिल सिब्बल यांच्यात थोडा वाद झाला. महाराष्ट्र सरकारच्या वतीने आमची मुख्य याचिका आहे म्हणून आम्हाला पहिल्यांदा आम्हाला संधी मिळावी, असं मुकुल रोहतगी रोहतगी म्हणाले. कपिल सिब्बल यांनी इंटर्वेनेरच्या वतीने युक्तिवाद केला. तर राज्य सरकारची बाजून मुकुल रोहतगी यांनी मांडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button