breaking-newsमहाराष्ट्र
मराठा आरक्षण : लातूरमध्ये दोन गटात वाद
लातूर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र झाले असून मराठा क्रांती मोर्चातर्फे आज मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे. शिवाय राज्यातील अनेक भागातही बंद सुरु आहे. यादरम्यान मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले असून लातूरमध्ये दोन गटात वाद झाला.
बंदच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात मराठा आंदोलकांकडून दुकाने जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. शिवाय भाजीपाल्याच्या हातगाड्याही उलटल्या होत्या. यावरून दोन गटात वाद उफाळला. तर दुसरीकडे मुंबईतील वांद्रामध्ये मराठा आंदोलक हात जोडून दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्यास विनंती करत होते.