breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मराठा समाजाचे नुकसान होऊ नये हीच आमची इच्छा : अशोक चव्हाण

मुंबई | प्रतिनिधी

मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यावरून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. आज आज सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेस नेते आणि राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाचे नुकसान होऊ नये हीच माझी प्रामाणिक भावना असल्याचे म्हटले आहे.

या बैठकीला अशोक चव्हाण यांच्यासह मंत्री  एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अशोक चव्हाण म्हणाले की, मला कोणत्याही राजकीय विषयावर भाष्य करायचं नाही. मराठा आरक्षण हा राजकीय विषय असू शकत नाही. फ़डणवीस सरकारने घेतलेले मुद्देच आम्ही पुढे घेऊन जात आहोत. मराठा समाजाचं नुकसान होऊ नये हीच माझी प्रामाणिक भावना आहे.

बैठकीबाबत माहिती देताना चव्हाण म्हणाले की, बैठकीत गेल्या 10-12 दिवसातील हायकोर्टाचे निर्णयांविषयी चर्चा करण्यात आली. EWS किंवा SCBC या दोघांपैकी एक काहीतरी घ्या, असे न्यायालयाने म्हटले होते. यावर चर्चा झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button