breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

मराठा आरक्षण : छत्रपती उदयनराजे गरजले…उद्रेक झाला तर सरकार जबाबदार!

सातारा । प्रतिनिधी

महाराष्ट्र आरक्षणाबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. दरम्यान सरकारनं मराठा बांधवांची परीक्षा पाहून नये मराठा समाजाच्या प्रश्नांवर तातडीनं तोडगा काढावा असं आवाहन ठाकरे सरकारला केलं आहे.तसेच मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद मागे घेतल्याचं देखील सुरेश पाटील यांनी सांगितलं आहे.

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबुक पोस्ट करून हे आवाहन केलं आहे. ‘महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली. तरीही सरकारने 11 ऑक्‍टोबरलाच परीक्षा घेण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला. एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असताना तसेच मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आलेला असतानासुद्धा सरकारला MPSC परीक्षा घेण्याची एवढी घाई का?

जर सरकारने MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तात्काळ घेतला नाही तर त्याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील. मराठा समाज हा जितका संयमी आहे, तितकाच तो आक्रमकही आहे. याची जाणीव ठेवून सरकारने MPSC च्या परीक्षेसाठी संपूर्ण मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नये.’

पुढे उदयनराजे म्हणतात, ‘ येत्या 11 तारखेला MPSC ची परीक्षा घेतल्यास मराठा तरुणांचे न भरून येणारे मोठे नुकसान होणार आहे. तरीही सरकारने ही परीक्षा घेण्याची अन्यायकारक भूमिका घेतली. मराठा आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर लगेच 15000 जागा भरण्याची सरकारला एवढी घाई का ? आरक्षणाच्या स्थगितीमुळे मराठा समाजात प्रचंड मोठा संताप निर्माण झाला आहे. तरीसुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार करत आहे.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button