breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र यावे लागेल – संभाजीराजे

मराठा आरक्षणासाठी सर्वांना एकत्र यावंच लागेल, अशी गर्जना संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. सातारा, कोल्हापूर छत्रपती एकत्रच आहेत, अशी ग्वाही यावेळी संभाजीराजे यांनी दिली.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून योग्य समन्वय साधला जात नसल्याची टीका राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. मराठा आरक्षणासाठी लढा अधिक तीव्र करावा लागणार आहे. ही शेवटची लढाई आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावे लागेल अशी गर्जना संभाजीराजे यांनी यावेळी केली. मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून योग्य समन्वय साधला जात नसल्याची टीका राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र यावं लागले. ही शेवटची लढाई आहे, असे ते म्हणाले. आम्ही दोन्ही छत्रपती एकत्रच आहोत. सातारा आणि कोल्हापूर एकच आहे, असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केले. दरम्यान, तीन ऑक्टोबर रोजी पुण्यात विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी साताऱ्यात दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button