breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये; त्यांच्या आरोग्याची काळजी, जेवणाची व राहण्याची व्यवस्था सरकार करणार

‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढला असून, त्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे..मात्र यामुळे हातावरच पोट असणा-या मजूरांचा प्रश्न निर्माण झाला आहे…त्यांच्यावर अवलंबून असणा-या त्यांच्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे… लॉकडाऊनमुळे वाहतूकसेवा बंद असल्याने हे नागरिक गावी जाऊ शकत नाहीयेत किंवा ते आपल्या कुटूंबापर्यंत पोहचू शकत नाहीयेत..त्यामुळे त्यांनी पायीच जाण्याचं ठरवलं आहे..मात्र आता मजूर, कामगार यांनी कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

या मजुरांच्या आरोग्याची काळजी, जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी शासन सक्षम आहे, असे त्यांनी सांगितले. , मजूर, कामगारांचे आरोग्य, जेवण, तसेच जिथे आहात त्याच ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश महसूल यंत्रणेला आणि स्थानिक प्रशासनाला दिले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे कोणीही कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये. मदतीची आवश्यकता असल्यास तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महानगरांच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button