मंत्र्यांच्या बंगल्यांसाठी कोट्यवधीची उधळपट्टी, खर्च मर्यादित ठेवण्याचा अजित पवारांचा आदेश…
मुंबई | महाईन्यूज |
महाराष्ट्र विकास आघाडीतील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधीची उधळपट्टी होत आहे. 31 बंगल्यांसाठी तब्बल 15 कोटींचा खर्च करण्यात येत आहे…मात्र याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची दखलं घेत सर्व मंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्च मर्यादित ठेवण्याचा आदेश सार्वजनिक विभागाला दिला.
बंगल्यांवर होणारा खर्च मर्यादित ठेवा, असा आदेश अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. तसंच वास्तुविशारदांनी सुचवलेल्या महागड्या वस्तूंचा खर्च टाळावा, अशी सूचनाही अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे. यासंदर्भात पत्रक जारी करण्यात आलं आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने 31 बंगल्यांसाठी निविदा काढल्यात आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी जवळपास 15 कोटी रुपयांचा खर्च होत आहे. म्हणजेच एका बंगल्यावर साधारणत: 80 लाख ते दीड कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.
मात्र याबाबत आता उपमुख्यमत्र्यांनी चांगलीच खबरदारी घेतली आहे…