पिंपरी / चिंचवड

भारतीय संविधानातच आदर्श लोकशाहिचा राजमार्ग – अरुण चाबुकस्वार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – संविधानाचे पालन आणि रक्षण करणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. आर्दश लोकशाहीचा राजमार्ग संविधानात दडलेला आहे. जनतेला संविधान खूप महत्वाचे आहे, असे प्रतिपादन क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अरुण चाबुकस्वार यांनी केले.

क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त रहाटणीत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने संविधान जागर सप्ताह घेण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच महापुरुषाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, भारिपचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, मावळचे अध्यक्ष माउली सोनावणे, समस्त गावकरी मंडळ रहाटणीनीचे अध्यक्ष देवाअप्पा नाखाते, रमेश नखाते, आबासाहेब पांढरे, विशाल जाधव, कल्पना हालू, विजय जगताप, भगवान गोडांबे, बी. एस.  कांबळे, युवराज प्रगणे, सुरेश भालेराव आदी यावेळी उपस्थित होते.

देवेद्र तायडे यांनी संविधानातील सखोल माहिती सांगितली. अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते संविधानाच्या प्रती भेट देण्यात आल्या. महत्मा फुले यांच्या कार्याचा वसा घेतलेल्या समाज प्रभोधनकार शारदा मुंडे यांचा “मी सावित्रीबाई बोलते” हा एकपात्री कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रहाटणीतील ज्येष्ठ नागरिक आर. डी. भालेराव यांनी लिहिलेले आत्मचरित्र “माझे इंदू सदन” या पुस्तिकेचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचा शेवट २६/११ च्या शहीद जवाणांना श्रध्दाजंली वाहून करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम भालेराव, गोरख रोकडे यांनी केले. आभार तात्या शिनगारे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button