breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘भाजपला शिवाजी महाराज केवळ निवडणुकांपुरते हवे असतात’- भाई जगताप

मुंबई: भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली होती. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिलेली आहे.

यानंतर आता राज्यातील काँग्रेसचे नेते आक्रमक झालेले आहेत. भाजपला शिवाजी महाराज केवळ निवडणुकांपुरतेच हवे असतात, अशी टीका काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानीचे नाव घेतलेले तुम्हाला चालणार नाही? तुमचं शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम बेगडी आहे, हे आम्हाला माहिती आहे. शिवाजी महाराज तुम्हाला केवळ निवडणुकांपुरतेच हवे असतात. व्यंकय्या नायडू यांचा जाहीर निषेध, असे भाई जगताप यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button