‘भाजपला शिवाजी महाराज केवळ निवडणुकांपुरते हवे असतात’- भाई जगताप
मुंबई: भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली होती. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिलेली आहे.
एव्हढी मस्ती❓😡
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) July 22, 2020
छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि आई भवानी चे नाव घेतलेल तुम्हाला चालणार नाही❓🤔
तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच बेगडी प्रेम आम्हाला माहीत आहे भाजपा च्या बेडकांनो
तुम्हाला छत्रपती फक्त निवडणुकांपुरतेच हवे असतात 😡
व्यंकय्या नायडू चा जाहीर निषेध 😡 pic.twitter.com/Q1LukXHuVJ
यानंतर आता राज्यातील काँग्रेसचे नेते आक्रमक झालेले आहेत. भाजपला शिवाजी महाराज केवळ निवडणुकांपुरतेच हवे असतात, अशी टीका काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानीचे नाव घेतलेले तुम्हाला चालणार नाही? तुमचं शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम बेगडी आहे, हे आम्हाला माहिती आहे. शिवाजी महाराज तुम्हाला केवळ निवडणुकांपुरतेच हवे असतात. व्यंकय्या नायडू यांचा जाहीर निषेध, असे भाई जगताप यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेले आहे.