भरमसाठ घरपट्टी रद्द करा
राहुल भोसले युवा मंचची अधिकाऱ्यांकडे मागणी
पिंपरी | प्रतिनिधी
कोरोना व लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. नागरिकांचा रोजगार धंदा बुडाला. आर्थिक नुकसान झाले. या काळात वाईट परिस्थिती असताना नागरिकांवर लादलेली भरमसाठ घरपट्टी रद्द करावी, अशी मागणी राहुल भोसले युवा मंचच्या वतीने करण्यात आली. महापलिकेच्या संबधित अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी त्याबाबत निवेदन दिले आहे.
या वेळी ज्ञानोबा धावारे, अशोक देवकर, किशोर गवळी, संजय जाधव, दत्ता जाधव, बापू सावंत, विनोद गायकवाड, स्नेहलता पाटोळे, सुनिता पाटोळे, संतोष खुडे, आतिष पाटोळे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
विठ्ठलनगरमध्ये नागरिकांना अवाजवी घरपट्टी आलेली आहे. कोरोना काळात लोकांचे रोजगार बुडाल्याने सध्या जीवन जगणे मुश्किल झाले आहे. असे असताना सरसकट ४६ हजारांपर्यंत नागरिकांना घरपट्टी आकारली गेली आहे. या विरोधात व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता घरपट्टी सरसकट माफ करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. या बाबत विठ्ठलनगर येथील राहुल भोसले युवा मंचाच्या वतीने महापलिका आयुक्त, क्षेत्रीय आधिकारी “क”प्रभाग, प्रशासन व मंडलाधिकारी, करसंकलन विभाग या आधिकाऱ्यांना निवेदन दिले.