breaking-newsराष्ट्रिय
बिहारमध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर; १६ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवला
पाटणा – बिहारमध्ये कोरोना विषाणूची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. कोरोनाचे रोज मोठ्या संख्येने नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने 1 ऑगस्टपासून ते 16 ऑगस्टपर्यंत 16 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
बिहारमध्ये 1 ऑगस्ट ते 16 ऑगस्टच्या लॉकडाऊन काळात केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालये 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहणार आहेत. तर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, मेडिकल, रुग्णालये पूर्वीसारखीच सुरू राहणार आहेत. परिवहन सेवा, टॅक्सी आणि रिक्षांना रस्त्यावर धावण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, बिहारमध्ये आज कोरोनाचे 2 हजार 328 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बिहारमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 45 हजार 919 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात राज्यात 14 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.