breaking-newsमुंबई
प्रेमसंबंध अमान्य, मुलाच्या वडिलांनीच केला मुलीचा खून
देवरूख (रत्नागिरी) – आपल्या मुलाशी असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने वडिलांनीच विशाखा अजय महाडीक (१८, कसबा) हिचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सुनिल रामचंद्र गुरव (४७, चेंबूर, मुंबई) यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.
विशाखा १ डिसेंबर रोजी सकाळी महाविद्यालयाला जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती. सायंकाळी ती घरी न आल्याने तिचा शोध सुरु झाला. पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. ५ डिसेंबर रोजी संगमेश्वर तालुक्यातील मोगरवणे खांबटमाळ येथे अज्ञात तरूणीचा मृतदेह सापडला. तपासानंतर तो तिचाच मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.
विशाखा हिला संपवायचेच, या हेतूने आपण मुंबईतून गावी आलो होतो. तिला देवरूख बसस्थानकावर बोलावले. तिला रिक्षातून मोगरवणे जंगलात नेले. ओढणीने गळा दाबून तिला मारल्याचे गुरव यांनी सांगितले.