breaking-newsराष्ट्रिय

पोलिसांनी उघड्यावरच जाळला ६३ हजार किलो गांजा आणि…

विशाखापट्टणममध्ये पोलिसांनी चक्क ६३ हजार ८७८ किलो गांजा जाळून नष्ट केला. पोलिसांनी मागील दहा वर्षांमध्ये ४५५ प्रकरणांमध्ये जप्त केलेला १५ कोटींचा गांजा जाळून टाकला. इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा जाळल्याने कापुलूपाडा डम्पिंग ग्राऊंडवर अनेक तास धुराचे सम्राज्य तयार झाले होते.

विशाखापट्टणम जिल्ह्यामधील वेगवेगळ्या भागांमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेला गांजा मागील अनेक वर्षांपासून पडून होता. अखेर पोलिसांनी तो शुक्रवारी एकत्र करुन जाळला. यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये जप्त करण्यात आलेला गांजा गाड्यांमधून गोळा करुन कापुलूपाडा डम्पिंग ग्राऊंडवर आणण्यात आला. गोण्यांमध्ये भरलेल्या या गांजाचे वजन करण्यात आल्यानंतर त्याला आग लावण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button