“पोलिसांची पिळवणूक, पत्रकारांचा छळ, साधूंची हत्या, गरीबांचे पैसे लाटणे बंद करा”
करोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत भाजपाने ‘ माझे अंगण, माझे रणांगण‘ आंदोलनाची हाक दिली असून राज्यभरात आंदोलन केलं जात आहे. राज्यभरातील भाजप कार्यकर्ते व नागरिक घराबाहेर फलक, काळे झेंडे फडकवतील, काळ्या फिती लावतील आणि सरकारचा निषेध करत आहे. भाजपा आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राज्यभरात होणाऱ्या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. दरम्यान ट्विटरच्या माध्यमातूनही ते राज्य सरकारवर टीका करत आहे.
यावेळी भाजपाने काही ट्विट केले आहेत. यामधील एका ट्विटमध्ये भाजपाने पोलिसांची पिळवणूक, पत्रकारांचा छळ, साधूंची हत्या, गरीबांचे पैसे लाटणे बंद करा आणि शेतकरी,शेतमजुरांना ५० हजार कोटींचे पॅकेज द्या अशी मागणी केली आहे.
पोलिसांची पिळवणूक, पत्रकारांचा छळ, साधूंची हत्या, गरीबांचे पैसे लाटणे करा बंद!!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 22, 2020
शेतकरी,शेतमजुरांना ५० हजार कोटींचे पॅकेज द्या!!#MaharashtraBachao pic.twitter.com/V64JtbnsBi