breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
पुढील दिशा ठरविण्यासाठी कोर्टाच्या लिखत आदेशाची वाट पाहतो आहे- पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे
मुंबई |
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिलेली आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटलेले आहे की, मेट्रो 3 सोबतच 6,4 आणि 14 च्या दृष्टीने ही जमीन महत्त्वाची आहे. या जमीनीमुळे राज्य सरकारचे 500 कोटी रुपये वाचत आहेत. तर तब्बल 1 कोटी जनतेला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे न्यायालयाचा लिखीत आदेश येईपर्यंत आम्ही वाट पाहात आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलेले आहे.
वाचा- राज्य निवडणूक आयोग; ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छुकांना मोठा दिलासा जात वैधता प्रमाणपत्राबाबत निर्णय