breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये पाणी कपातीचा निर्णय; कालवा समितीच्या बैठकीत निर्णय

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पवना धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. धरणातील उर्वरित पाणीसाठा जुलैपर्यंत काटकसरीने वापर करणे गरजेचे असून, त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने दिवसाला ४८० ऐवजी ४४० एमएलडीच पाणी उचलावे, असा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत झाला आहे. त्यामुळे काटकसरीने पाणी वापरावे, असे पत्र पाठबंधारे विभागाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठविले आहे.

पिंपरी चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिकेला पवना धरणातून वार्षिक ४.८४ टीएमसी पाणी वापरास सरकारने मंजुरी दिली आहे. पवना धरणातून महापालिका दररोज ४८० एमएलडी पाण्याचा उपसा करते. रावते बंधा-यातून पाणीउपसा करून शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधारा गाळाने भरला आहे. त्यामुळे बंधा-याची पातळी थोडी जरी कमी झाली तरी महापालिकेचे पंप बंद पडतात. परिणामी, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. पवना धरणातून रावेत बंधा-यापर्यंत पवना नदीची लांबी ३८ किलोमीटर असून, पाणी सोडल्यानंतर बंधा-यापर्यंत पोहोचण्यास चौदा तासाचा वेळ लागतो. महापालिका मंजुरीपेक्षा जास्त पाणी उचलत आहे. रावेत बंधा-यातील पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणातून जास्त विसर्ग केल्यामुळे जास्तीचे पाणी वाया जात आहे. पावसाळ्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस बंद पडला. त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे लागले. परिणामी, धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे धरणातील उर्वरित पाणीसाठा जुलैपर्यंत पुरविण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. पवना धरणामध्ये पाणीसाठा तुलनेने कमी आहे. त्यामुळे शहराचा पाणीवापर ४४० एमएलडीच ठेवावा, असे कालवा समितीच्या बैठकीत निर्णय झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button