breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
पालघर हत्याकांड प्रकरणी पोलीस अधिक्षकावर कारवाई – गृहमंत्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/55.jpg)
पालघर | अखेर पालघर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक गौरव सिंग यांना महाराष्ट्र सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई केली आहे. पालघर जिल्ह्यातील, डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे 16 एप्रिल रोजी 2 साधू व एक चालक यांची पोलिसांसमोर दगडाने ठेचून हत्या केली होती. या प्रकरणामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यांच्या नादान नेतृत्वावर प्रखर टिका देखील केली होती.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिंचले येथील घटनास्थळाला 7 मे ला भेट दिली व परिस्थिती समजून घेतल्यानंतर मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा केली. आता अतिरिक्त पोलिस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.