breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पालघर हत्याकांड प्रकरणी पोलीस अधिक्षकावर कारवाई – गृहमंत्री

पालघर | अखेर पालघर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक गौरव सिंग यांना महाराष्ट्र सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई केली आहे. पालघर जिल्ह्यातील, डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे 16 एप्रिल रोजी 2 साधू व एक चालक यांची पोलिसांसमोर दगडाने ठेचून हत्या केली होती. या प्रकरणामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यांच्या नादान नेतृत्वावर प्रखर टिका देखील केली होती.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिंचले येथील घटनास्थळाला 7 मे ला भेट दिली व परिस्थिती समजून घेतल्यानंतर मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा केली. आता अतिरिक्त पोलिस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button