breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
पालघर मध्ये पावसाचे थैमान
नालासोपारा – मंगळवार रात्रीपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने पालघर जिल्ह्यात अनेक भागांत चांगलाच धुमाकूळ घातला. रात्रभर सुरू असलेला पाऊस बुधवारी दिवसभरही कोसळतच होता. या पावसाने जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. तसेच सखल भाग पाण्याखाली गेलेले दिसले. धरण क्षेत्रांतही चांगला पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटण्यास बऱ्यापैकी मदत झाली असली, तरी ग्रामीण भागात मात्र शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.