breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालघर घटनेवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

पालघर येथे जमावाने तिघांची ठेचून हत्या केल्याप्रकरणी राज्य सरकारवर होणाऱ्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे. पालघरच्या घटनेचं राजकारण करू नका असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

“पालघरमध्ये घडलेली घटना आणि करोनाचा काहीही संबंध नाही. पालघरवरून कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र बनवलं जात आहे. पालघरमधये जे काही झालं त्याचा कशाशी संबंध असेल तर त्याचे चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकरणातील काही लोकांना अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर काही तासांमध्ये राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनानं याची दखल घेतली. अशी प्रकरणं घडायला नको. ते निषेधार्ह आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button