breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा; धरणातून पाण्याचा होणार विसर्ग

पिंपरी |महाईन्यूज|

मावळ, पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. सध्यस्थितीत धरणात 95 टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण लवकरच शंभर टक्के भरणार आहे. मात्र, धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे पवना नदी काठावरील गावांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अशोक शेटे यांनी केले आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर सुरूवातीचे दोन महिने पावसाने ओढ दिल्याने मावळातील धरणे भरतील का नाही? अशी शंका असताना ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने पवना धरण 95 टक्के भरले आहे. लवकरच धरण शंभर टक्के भरणार असल्याने पाणी नदीपात्रात सोडण्यात येईल. यामुळे नदी पात्रालगत असलेल्या गावांनी खबरदारी घ्यावी. सर्व नागरिकांनी सतर्क रहावे. नदी तीरावरील सर्व साधनसामुग्री, वाहने व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. जेणेकरून कुठल्याही प्रकारची हानी हाेणार नाही याची काळजी घेण्यात यावी व जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन शेटे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button