breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना धरणात बुडून मुंबईच्या दोन तरुणांचा मृत्यू

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पवना धरण परिसरात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या मुंबईतील दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अमेय दिलीप राहते ( वय २५) व तेजस रवि पांगर ( वय २२ दोघेही रा. काळाचौकी, अभ्युदयनगर, मुंबई) अशी त्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवारी (दि.१५) पवना धरण परिसरात अमेय व तेजस हे त्यांच्या अन्य दोन मित्रांसोबत पवना धरण परिसरात फिरायला आले होते. दुपारी दोनच्या सुमारास सर्वजण पाण्यात पोहण्याकरिता उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडुन दोघांचा मृत्यू झाला. घटनास्थळाकडे आलेल्या इतर पर्यटकांनी अमेय व तेजस यांना पाण्यातून बाहेर काढले.

त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे सहायक फौजदार सुनील बाबर करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button