परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा
मुंबई: परदेश शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्याच शाखेतून पदवी घेण्याबाबत असलेले बंधन शिथिल करण्यात आलेले आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली. या घोषणेने परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. ज्या शाखेतील पदवी आहे, त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल, तरच परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल, हा भाजप सरकारच्या काळात घेण्यात आलेला निर्णय धनंजय मुंडेंनी मागे घेतला आहे. थोडक्यात, एखाद्या विद्यार्थ्यांने आधी घेतलेले पदवी शिक्षण एका शाखेचे असले आणि परदेशी विद्यापीठात त्याला दुसऱ्या शाखेत पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा असेल, तरी त्याला परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे.
परदेश शिष्यवृत्तीसाठी ज्या शाखेत पदव्युत्तर प्रवेश त्याच शाखेचे पदवी शिक्षण अनिवार्य हा नियम आता रद्द करण्यात आला असून नव्या नियमानुसार परदेशी विद्यापीठाने एखाद्या विद्यार्थ्याला विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश दिला असेल व त्याचे पदवी शिक्षण अन्य शाखेतून पूर्ण असेल (1/2)
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 7, 2020
‘परदेश शिष्यवृत्तीसाठी ज्या शाखेत पदव्युत्तर प्रवेश त्याच शाखेचे पदवी शिक्षण अनिवार्य’ हा नियम आता रद्द करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार परदेशी विद्यापीठाने एखाद्या विद्यार्थ्याला विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश दिला असेल व त्याचे पदवी शिक्षण अन्य शाखेतून पूर्ण असेल तरीही त्याला परदेश शिष्यवृत्तीचा लाभ मिळवता येणार आहे’ असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. “पदव्युत्तरसाठी वयोमर्यादा 35 वर्षे, तर पीएचडीसाठी 40 वर्षे अशीच राहील. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन/ई-मेलद्वारे अर्ज दाखल करावेत. 14 ऑगस्टपर्यंत दिलेली मुदतही वाढवण्यात येईल” असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
परदेश शिष्यवृत्तीसाठी ज्या शाखेत पदव्युत्तर प्रवेश त्याच शाखेचे पदवी शिक्षण अनिवार्य हा नियम आता रद्द करण्यात आला असून नव्या नियमानुसार परदेशी विद्यापीठाने एखाद्या विद्यार्थ्याला विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश दिला असेल व त्याचे पदवी शिक्षण अन्य शाखेतून पूर्ण असेल (1/2)
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 7, 2020