breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पंकजा मुंडेंनी अखेर मौन सोडलं

महाईन्यूज | मुंबई

राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या एका फेसबुक पोस्टवरुन त्या पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. आता या संपूर्ण विषयावर स्वत: पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.मी पक्ष सोडणार या निव्वळ अफवा आहेत. माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केला गेला. मी खूप व्यथित आहे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. आपण भाजपा सोडणार नाही हे सुद्धा पंकजा मुंडेनी स्पष्ट केले आहे.

पद मिळवण्यासाठी मी दबाट टाकतेय हा आरोपही संपूर्णपणे चुकीचा आहे. मी पक्षाची निष्ठावान कार्यकर्ता असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.मंगळवारी भाजपाचे नेते विनोद तावडे आणि राम शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर तावडे म्हणाले, “पंकजा मुंडे दरवर्षी अशी पोस्ट टाकतात. पण, यावेळी त्यांच्या पोस्टचा विरोधकांनी विपर्यास केला. त्यामुळे त्या व्यथित झाल्या आहेत.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button