breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतक-यांना लवकरच गोड बातमी- नगरविकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

राहुरी | महाईन्यूज

कर्ज माफीसाठी कुणालाही हेलपाटे मारावे लागले नाहीत. कर्ज माफीनंतर दोन लाख रूपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकºयांनाही लवकरच शासन गोड बातमी देणार आहे़ विजेचा प्रश्न गेल्या शासनाच्या कालावधीत गंभीर बनला होता़ यापुढील काळात विजेचे कनेक्शन देतांना दिरंगाई होणार नाही, अशी ग्वाही नगरविकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. महाराजस्व अभियान अंतर्गत राहुरी तहसील कचेरीच्या प्रांगणात झालेल्या जनता दरबारमध्ये हजारो लोकांनी हजेरी लावली आहे.

रांगेत उभे राहून नागरीकांनी टोकन घेतले. त्यानंतर नागरिकांनी मंत्री तनपुरे यांच्यासमोर अडचणींचा पाढा वाचला़ यापुढील काळात नागरीकांची कामे करण्यासाठी पुढा-यांकडे येण्याची वेळ येऊ नये इतके चांगले काम करण्याचे निर्देश मंत्री तनपुरे यांनी दिलेले आहे. नियमीत कर्ज भरणा-यांना राज्य शासन सुखद बातमी देणार असल्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगताच उपस्थितांनी टाळयाच्या गजरात स्वागत केले़ कर्जमाफी प्रकरणात सुटसुटीत पणा आला आहे़ महिला किंवा दिव्यांपंगांना त्रास झाला नाही़ गेल्या सरकारच्या काळात अनेक महिने कर्जमाफीचा घोळ सुरू होता़ ब्राम्हणी गावाची कर्जमाफी आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे. यावर्षी पाण्याची परिस्थिती समाधानकारण असून शेतकºयांची गैरसोय होणार नाही,यादृष्टीकोनातून वीजेचे धोरण आखण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button