breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात २४ तासांत ८० हजार ४७२ नवे कोरोना रुग्ण

  • भारताने ६२ लाखांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली – कोरोना साथीच्या आजाराने संक्रमित देशांमध्ये भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्याबाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातच भारतातील कोरोना रुग्ण संख्येने आता ६२ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात ८० हजार ४७२ नवे कोरोना रुग्ण आढळले असून १ हजार १७९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६२ लाख २५ हजार ७६४ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ९७ हजार ४९७ इतका झाला आहे. तसेच देशात आतापर्यंत ५१ लाख ८७ हजार ८२६ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या ९ लाख ४० हजार ४४१ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

दरम्यान, देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या लोकांची संख्याही सतत वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन कोरोना रुग्णांपेक्षा जास्त आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button