breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
देशातील प्रत्येक नागरिकाने सतर्क राहावे- संदीप पवार
- पुलवामा येथे शाहिद जवानांना आदरांजली
- चिंचवड येथे कँडल मार्च काढून आदरांजली
पिंपरी चिंचवड:-पिंपरी- देशातील सामाजिक एकात्मतेला बाधा निर्माण करून सुरक्षा यंत्रणेला आव्हान देण्याचे धाडस काही कुप्रवृत्ती करीत आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे. आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. यासाठी आपण आता प्रयत्नशील राहूया, असे आवाहन राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप पवार यांनी केले.
पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय वीर जवानांना चिंचवड विधानसभेतील वेताळनगर येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, माऊली सूर्यवंशी, पिंपरी चिंचवड सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विनोद कांबळे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, शाहिद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी वेताळनगर ते चापेकर चौक कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी नगरसेवक नाना काटे, सामाजिक कार्यकर्ते माऊली सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.