breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३१ हजारांच्या पलीकडे

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांची संख्या ३१ हजार ३३२ वर पोहोचली आहे. यापैकी १००७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्या असून ७ हजार ६९५ रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. तर गेल्या २४ तासांत १ हजार ८९७ नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आज (२९ एप्रिल) केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

देशात कोरोनामुळे मृत्यूंच्या संख्येनेही एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. भारतात १६ जिल्हे असे आहेत की, गेल्या २८ दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळले नाही. लाखीसराई (बिहार), बिलासपूर (छत्तीसगढ), दुर्ग (छत्तीसगढ), राजनांदगाव (छत्तीसगढ), दक्षिण गोवा (गोवा), कोडागू (कर्नाटक), चित्रदुर्ग (कर्नाटक), दावणगेरे (कर्नाटक), इंफाळ पश्चिम (मणिपूर), ऐझॉल (मिझोरम), गोंदिया (महाराष्ट्र), माहे (पुदुच्चेरी), प्रतापगढ (राजस्थान), भद्राद्री कोथागुदेम (तेलंगणा), पौरी गढवाल (उत्तराखंड) आणि शिवपुरी (मध्य प्रदेश) या जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण नाही.महाराष्ट्रातल्या गोंदियाचा यात समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल दिली .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button