दिल्लीसारखी स्थिती महाराष्ट्रात होऊ नये – आदित्य ठाकरे
मुंबई | महाईन्यूज
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करताना दिल्लीसारखी स्थिती महाराष्ट्रात होऊ नये असं म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पर्यावरण जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली होती. आदित्य ठाकरे यांची ही संकल्पना आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. मी माझ्या वाढदिवसाला किमान एक झाड लावेन आणि त्याचे संगोपन करेन अशी शपथ यावेळी विद्यार्थ्यांसहित सर्वांनीच घेतली होती.
कार्यक्रमानंतर बोलताना आदित्य ठाकरे यांनी नाइट लाइफवरुन सुरु असलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. “‘टीकेला उत्तर द्यावं असं वाटत नाही. पण मन दूषित असेल तर दृष्टीकोनही तसाच असतो. महाराष्ट्रातील जनतेचं मन स्वच्छ आहे. दुकाने रात्री उघडी राहिल्याने फायदा होईल. रोजगाराची संधी निर्माण होईल. महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेत आहेत”. पुढे बोलताना त्यांनी टीका करणाऱ्या नेत्यावंर टीका करता हिंमत असेल तर त्यांनी केंद्र सरकारला नोटाबंदी, जीएसटीसारख्या निर्णयांबद्दल विचारुन दाखवावं असा टोला लगावलेला आहे.