breaking-newsराष्ट्रिय

‘त्या’ स्फोटानंतर अफगाणिस्तानात शीख समुदाय भयभीत

काबुल : ‘इस्लामी स्टेट’च्या अतिरेक्यांनी रविवारी जलालाबाद शहरात घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात १३ आप्तेष्ट ठार झाल्यावर संख्येने आधीच रोडावलेल्या शिख समुदायाची ‘आता अफगाणिस्तानात राहणे अशक्य’ असल्याची भावना दृढ होत असल्याचे दिसत आहे. रोजचा दिवस जीव मुठीत धरून जगणारे हे लोक भारताच्या आश्रयाला जाण्याच्या विचार करत  आहेत.

भारताच्या मदतीतून बांधलेल्या एका इस्पितळाच्या उदघाटनासाठी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी रविवारी जलालाबादमध्ये गेले होते. त्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या बव्हंशी अल्पसंख्य समाजातील लोकांची बस ‘इसिस’च्या अतिरेक्यांनी उडवून दिली. त्यात येत्या आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुकीतील एक उमेदवार अवतार सिंग खालसा व आणखी एक सामाजिक नेते रावैल सिंग यांच्यासह शिख समुदायातील १३ व्यक्ती ठार झाल्या होत्या. या भीषण हत्याकांडानंतर ‘आता आम्हाला येथे राहणे शक्य नाही’, असे सांगून अवतार सिंग यांचे पुतणे व हिंदू व शिखांच्या राष्ट्रीय समितीचे सचिव तेजवीर सिंग यांनी भयभीत शिख समुदायाच्या मनातील कमालीची असुरक्षितता व्यक्त केली.

जलालाबाद घटनेनंतर काही शिखांनी काबुलमधील भारतीय वकिलातीमध्ये आश्रय घेतला आहे. मृतांना भारतात नेऊन तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी भारताने दर्शविली. पण १३ पैकी आठ मृतांवर जलालाबादमध्येच कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले.जलालाबादमधील हत्या हा अफगाणिस्तानच्या संमिश्र संस्कृतीवर आघात आहे, असे म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध नोंदविला. येथील अल्पसंख्य समाजाच्या सुरक्षेचा ते विशेष बैठक घेऊन आढावाही घेणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button