breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘त्या’ नराधमाला कडक शासन होईल – जयंत पाटील

  • जयंत पाटील यांनी त्या युवतीला वाहिली श्रध्दांजली…

मुंबई | महाईन्यूज

ज्या नराधमाने हिंगणघाटमधील युवतीवर वेळ आणली त्याला कडक शासन होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.हिंगणघाटमधील त्या युवतीची आज मृत्यूशी झुंज संपली. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी अशा नराधमांना कठोर शासन करण्याचे संकेत दिलेले आहेत.

https://youtu.be/G7VzXIvHo_M

हिंगणघाटमधील युवतीवर ज्या नराधमाने ही वेळ आणली त्या नराधमाने कडक प्रायश्चित्त करावं ही महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळे त्या नराधमावर कडक कारवाई केली जाईल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.अशी मानसिकता महाराष्ट्रातील कोणातही असू नये यासाठी जरब बसली पाहिजे असेही जयंत पाटील म्हणाले.

मागच्या काळात अशा गंभीर दोन- तीन घटना घडल्या आहेत अशा मानसिकतेला अद्दल घडवण्याची गरज आहे त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमावर सरकारकडून कडक कारवाई होईल अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button