महाराष्ट्रमुंबई

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘त्या’ दोन खोल्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

6 डिसेंबर या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिवशी परेल परिसरातल्या बीआयटी चाळीतील ज्या दोन खोल्यांमधून बाबासाहेबांनी आपला प्रवास सुरु केला त्या चाळीला मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी अनेक मान्यवरांसह भेट दिली.

चाळीतील या पवित्र जागेचं राष्ट्रीय स्मारक व्हावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे केली आहे. जगभरातील बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी परेल परिसरातील ही चाळ एक प्रेरणादायी राष्ट्रीय स्मारक व्हावी असही त्यांनी मत व्यक्त केलं आहे .

बाबासाहेबांची सुवर्ण वर्ष ज्या दोन खोल्यांमध्ये गेली आहेत, त्या खोलीमध्ये येऊन ते बाबासाहेबांचं स्मरणही करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीआयटी चाळीमध्ये आपल्या आयुष्यातील 22 वर्षांचा कालखंड घालवला. या वास्तूमधील दोन खोल्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि त्यांचे कुटुंबीय राहत होतं. याच इमारतीमधून अनेक ऐतिहासिक घटनाही घडलेल्या आहेत.

मुंबईतील परेल परिसरातील चार मजली वास्तू आजही या ऐतिहासिक गोष्टी आपल्या उरात बाळगून उभी आहे. या वास्तूच्या दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 50 आणि खोली क्रमांक 51 या दोन खोल्यांमध्ये बाबासाहेबांचा संसार थाटला. पण देशातील अनेक ऐतिहासिक घडामोडी, बाबसाहेबांनी केलेलं मनन, चिंतन, अभ्यासाची खोली क्रमांक 50 ही प्रत्यक्ष साक्ष राहिली आहे. आणि म्हणूनच या चाळीचं रुपांतर राष्ट्रीय स्मारकामध्ये करावं अशीच सर्वांची ईच्छा आहे. मात्र आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या गोष्टीची लवकरात लवकर दखल घेनंही तितकचं सर्वांना अपेक्षित आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button