‘टू मॅन आर्मी’चा खेळ खल्लास- शत्रुघ्न सिन्हांचा मोदी-शहांना खोचक टोला
पाटणा | महाईन्यूज
झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाल्यानंतर विरोधकांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. यावरून काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ट्विट करून निशाणा साधला आहे. ‘वन मॅन शो आणि टू मेन आर्मी’, तुमचा खेळ संपलेला आहे. ‘खामोश, झारखंड बीजेपी… टाटा, बाय-बाय!’, असा टोला त्यांनी भाजपला लगावलेला आहे.
तसेच आता दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्येही हेच पाहायला मिळेल, असा दावा शत्रुघ्न सिन्हा यांनी केलेला आहे. या ट्विटमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी झारखंडमधील विजयाबद्दल काँग्रेसच्या सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभारही मानलेले आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) आघाडीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालेले आहे.
हाच धागा पकडत शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपवर हल्लाबोल केलेला आहे. तर, दुसरीकडे रघुबर दास यांना पराभवाचा धक्काच बसलेला आहे. अपक्ष उमेदवार सरयू राय यांनी त्यांना मात दिलेली आहे.