breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जनता कर्फ्युला गालबोट,जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी एकत्र येत काढली रॅली

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार देशवासियांनी २२ मार्च रोजी म्हणजे काल सोमवारी जनता कर्फ्युचं सर्वांनी पालन केलं.कोरोनासारख्या भयानक विषाणूचा सामना करण्यासाठी भारत सज्ज असल्याचं या नागरिकांनी घरात बसून दाखवून दिलं. मात्र, सायंकाळी ५ वाजता एकत्र येऊन थाळीनाद, शंखनाद, टाळ्या वाजवणे आणि सेलिब्रेशन करणे, असे काही प्रकार घडल्याने या जनता कर्फ्युला गालबोट लागलंय.

विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनीही रस्त्यावर उतरुन शंख  आणि थाळी वाजवून लोकांसमवेत एकत्र येत कृतज्ञता व्यक्त केली. उत्तर प्रदेशातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

याबद्दल स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन संताप व्यक्त केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार पोलीस, डॉक्टर्स आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्चमाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सायंकाळी ५ वाजता देश एकत्र झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या घराबाहेर, खिडकीत उभे राहून नागरिकांनी टाळी, थाळी, शंख नाद करुन अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मात्र, याच काळात देशातील अनेक भागात लोक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

अनेकांनी तिरंगा झेंडा हातात  घेऊन जणू वर्ल्डकपची मॅचच भारताने जिंकली, असे सेलिब्रेशन केले. हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील पीलभीत जिल्ह्यात चक्क जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनीच शंख वाजवत रॅली काढल्याचे पाहायला मिळाले. लोकांनी एकत्र येऊ नये, सुरक्षित अंतर ठेऊन राहावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, येथील अधिकाऱ्यांनी नियम न पाळल्याचे दिसून आलं… 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button