breaking-newsआंतरराष्टीय
जगभरातल्या नागरिकांनी अनुभवले शतकातील सर्वांत मोठे चंद्रग्रहण
तेल अवीव : शतकातल्या सर्वात मोठ्या खग्रास चंद्रग्रहणाला भारतात शुक्रवारी रात्री ११ वाजून ५४ मिनिटांनी सुरुवात झाली. भारतात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने ते व्यवस्थित पाहता आले नाही. हे चंद्रग्रहण शनिवारी पहाटेपर्यत सुरू होते. जगभरात ठिकठिकाणी खगोलप्रेमींसह नागरिकांनी “याची देही, याची डोळा’ याचा अनुभव घेतला.
शुक्रवारी शतकातले सर्वात मोठे चंद्रग्रहण ११ वाजून ५४ मिनिटांनी सुरु झाले तर २ वाजून ४३ मिनिटांनी हे ग्रहण समाप्त झाले. तब्बल १ तास ४२ मिनट ५७ सेकंद चंद्र पूर्ण खग्रास अवस्थेत पाहायला मिळाला. भारतात ढगाळ वातावरणामुळे नागरिकांची चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली. दरम्यान, यापुढील अशी मोठी चंद्रग्रहणे ९ जून २१२३ व १९ जून २१४१ रोजी होणार आहेत.