चहामध्ये कमी साखर टाकल्याने नवऱ्याने गरोदर बायकोची गळा चिरुन केली हत्या
लखनऊ | उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या फक्त या कारणासाठी केली की, तिने त्याला कमी साखर असलेला चहा दिला. चहामध्ये कमी साखर टाकल्याने संतापलेल्या पतीने आधी आपल्या पत्नीशी या गोष्टीवरुव जोरदार भांडण केलं आणि नंतर चाकूने तिचा गळा चिरला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एका ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली. जिचं वय सुमारे ३५ वर्ष होतं आणि ती गरोदर देखील होती. दोघांचे १२ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्यांची मुले झोपली होती. जेव्हा पती-पत्नीचं भांडण सुरु झालं तेव्हा त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने मुलं जागी. मुलं आपल्या खोलीतून स्वयंपाकघरात जाईपर्यंत बराच उशीर झाला होता. कारण तोवर त्यांच्या बापाने त्यांच्या आईचा गळा चिरला होता. जेव्हा मुलं स्वंयपाकघरात पोहचली त्यावेळी त्यांची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. हे दृश्य पाहून मुलांना प्रचंड धक्का बसला.