चक्रीवादळातील नुकसानग्रस्त नागरिकांना उन्नति सोशल फाउंडेशनचा मदतीचा हात
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील अनेक नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. त्यांना मदतीचा हात म्हणून पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने सुमारे ७०० कुटुंबाना अन्न धान्य व घरउपयोग वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कोकण समुद्र किनारपट्टीवर प्रचंड प्रमाणात घरांचे नुकसान झालेले आहे. ज्यात घराचे छत उडुन गेल्यामुळे अन्नधान्य,व बरेच नुकसान घरांचे झाले आहे. तसेच लाईटचे पोल पडल्यामुळे सर्व ठिकाणच्या लाईट बंद झाल्या आहेत. म्हणून एक हात मदतीचा म्हणून उन्नती फाउंडेशन हे नेहमी आलेल्या संकट काळात मदतीसाठी पुढे असते. त्यामुळे उन्नती फाउंडेशन तर्फे रत्नागिरी येथे दापोली भागातील गावांमध्ये सुमारे ६०० ते ७०० कुटुंबाना अन्नधान्य वाटप केले. त्यावेळी श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ चिंचवडचा राजा या चिंचवडमधील मंडळाचे सहकार्य लाभले.